संस्थेबद्दल – जिजाऊ ब्रिगेड
जिजाऊंच्या प्रेरणेवर उभं राहिलेलं एक सबलीकरणाचं आंदोलन!
संस्कार. संघटन. सबलीकरण.
आपली कथा
जिजाऊ ब्रिगेड ही केवळ एक संघटना नाही, तर ती एक विचारप्रवाह आहे — राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांवर आधारित समाजनिर्मितीची चळवळ.
ज्या मातांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा योद्धा घडवला, त्या मातांच्या प्रेरणेने प्रत्येक स्त्री, युवक आणि नागरिकामध्ये नेतृत्व, आत्मविश्वास आणि देशभक्ती जागृत करणे हेच या संस्थेचं ध्येय आहे.
समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहे — महिला सबलीकरण, युवक विकास, शिक्षण आणि सामाजिक सेवा या चार स्तंभांवर आधारित हा प्रवास अखंड सुरू आहे.
मूल्याधिष्ठान
आमचे मूल्याधिष्ठान — जिजाऊंच्या संस्कारांची पायाभरणी
01.

संस्कार
जिजाऊंच्या शिकवणीवर आधारित नीतिमूल्ये
02.

संघटन
एकत्र येऊन बदल घडवण्याची ताकद
03.

सबलीकरण
प्रत्येक व्यक्तीला आत्मविश्वास देणारी चळवळ
04.

देशसेवा
समाज आणि राष्ट्रासाठी निस्वार्थ योगदान
“प्रेरणा जिजाऊंची, दिशा समाजाची!”
जिजाऊ ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक जिजाऊ दडलेली आहे — विचारात, कृतीत आणि संस्कारात.
आम्ही समाजाला दोष देत नाही, आम्ही समाज बदलतो.महिलांना शक्ती, युवांना दिशा आणि नागरिकांना जबाबदारीची जाणीव — हाच जिजाऊ ब्रिगेडचा शाश्वत उद्देश आहे.
आपण सर्वांनी मिळून हा प्रवास पुढे नेऊ या — संस्कार आणि सबलीकरणाच्या मार्गावर!
यशोगाथा आणि यश
1996
जिजाऊ ब्रिगेडची स्थापना – महिला मेळावा
2000
अधिवेशन – १
परभणी
2010
अधिवेशन – २
कोल्हापूर
2012
अधिवेशन – ३
वाशीम
2015
अधिवेशन – ४
वर्धा
2018
अधिवेशन – ५
नांदेड
2019
अधिवेशन – ६
अमरावती
2024
अधिवेशन – ७
सांगली
2025
अधिवेशन – ८
चंद्रपूर
जिजाऊ ब्रिगेड
आपला प्रभाव
हजारो महिलांना स्वावलंबनाचा मार्ग, शेकडो युवांना नवे उद्दिष्ट आणि हजारो नागरिकांना प्रेरणा देणारा प्रवास — जिजाऊंच्या विचारांची कृतीरूप कहाणी म्हणजेच जिजाऊ ब्रिगेड.
“जिजाऊंच्या प्रेरणेवर चाललेला प्रत्येक पाऊल — नव्या समाजनिर्मितीची दिशा!”
जिजाऊ ब्रिगेडचे ध्येय धोरणे आणि उद्दिष्टे
स्त्री-पुरुष सहजीवन निकोप होण्यासाठी आधुनिक मुल्यांची गरज लक्षात घेऊन जिजाऊ ब्रिगेड या कक्षाची स्थापना करण्यात आली. स्त्रियांची सर्वप्रकारच्या शोषणातून मुक्तता,हे मुख्य ध्येय ठेवून जिजाऊ ब्रिगेड कार्यरत आहे. आतापर्यंत विविध अधिवेशने, मराठा आरक्षण लढा, विकृत इतिहासाविरूध्दचा लढा जिजाऊ ब्रिगेडने धैर्याने लढला आहे. पुढील काळात सर्व प्रकारच्या आव्हांनांना तोंड देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडने वैचारीक बांधणी संपुर्ण महाराष्ट्र व इतरही राज्यांमधे केली आहे. अमर्याद असलेले क्षेत्र आपल्या उत्तुंग भरारीने काबिज करण्यासाठी संघटनेचे काही ध्येय धोरणे आणि उद्दिष्टे आहे.
- सशक्त नवसमाज निर्मितीसाठी प्रागतिक नवविचारांचा समाजातील सर्व स्रीयांना परिचय करून देणे.
- जगामध्ये आपल्या कर्तृत्वाने जागतिक विक्रम नोंदविणार्या आणि स्री जातीचे नाव उज्ज्वल करणार्या मुठभर भगिणी मोठभर करणे.
- भावी पिढीतील मुलींना विज्ञानाने व श्रमनिष्ठ बनविणे.
- बहूजन स्रीला आर्थिक, सामाजिक,कौटूंबिक आणि मानसिक गुलामगीरीतून बाहेर पडण्यासाठी आणि सर्वतोपरी सशक्त आणि बळकट होण्यासाठी वेगवेगळया विषयावर प्रशिक्षण देणे
- स्वकर्तृत्वानं आर्थिक स्वातंत्र्य आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळविण्याचा हक्क प्राप्त करून देणे.
- देवा, धर्माच्या नावावर होणार्या शोषणास पायबंध घालणे.
- राजकारणात सक्रीय सहभाग घेण्यासाठी स्रीयांना सक्षम बनविणे.
- मुलींनी प्रत्येकच क्षेत्र काबीज करण्यासाठी प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे.
- सांस्कृतिक, कला व क्रिडा क्षेत्रातील विशिष्ट समाजाची मक्तेदारी मोडीस काढून तिथे बहूजन समाजातील मुला-मूलींना स्थान प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- महिलांवर होणारे कौटूंबिक हिंसाचार,शोषण या विरोधात आवाज उठवण्यासाठी महिलांना कायद्याचे प्रशिक्षण देणे.
- महिलांमध्ये असलेले वेगवेगळया प्रकारचे कला, कौशल्य ओळखून त्यांंना विकसीत करणे.
- महिलांमधून लेखक, वक्ता, साहित्यिक निर्माण करणे. हे महत्वाचे उद्दिष्ट संघटनेचे आहे.
- कारण वाणीतून आणि लेखणीतूनच वैचारीक क्रांती होऊ शकते. हा विचार संघटनेने सुरवातीपासूनच रूजवला आहे.